PM Kisan Yojana : ‘या’ चुका दुरुस्त कराच नाहीतर 2 हजार अडकतील ; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाइन : पी एम किसान योजनेचा नववा हप्ता ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्स नी दिली आहे. या योजनेअंतर्गत मोदी सरकार कडून शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. हे सहा हजार रुपये 2000 च्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो. अर्ज भरताना जर आपली माहिती नोंदवताना एखादी चूक झाली तर पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. जर पंतप्रधान सन्मान योजनेचा अर्ज दाखल करताना काही चूक झाली तर अर्ज सादर करण्यापूर्वीच दुरुस्त करून घ्यावेत. आजच्या लेखात आपण हा अर्ज भरत असताना कोणत्या चुका होतात आणि त्या दुरुस्त कशा कराव्यात याबाबतची माहिती घेणार आहोत.

अर्ज भरताना या चुका करू नका

–प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा अर्ज दाखल करताना शेतकरी आधार क्रमांक किंवा काही वेळा बँक खाते क्रमांक चुकीच्या पद्धतीने भरतात.
— चुकीची माहिती भरली गेली असल्यानं शेतकऱ्यांना योजनेची रक्कम मिळत नाही.
–त्यामुळे प्रतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ता जाहीर होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्यांची माहिती दुरुस्ती करुन घेणं आवश्यक आहे.
–आपण आधार क्रमांक चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केला असेल तर आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर (pmkisan.gov.in) भेट देऊन ते दुरुस्त करू शकता.

अर्जातील चुका कसा कराल दुरुस्त ?

–आपल्याला पीएम किसानच्या वेबसाइटवर ‘फार्मर कॉर्नर’ सापडेल.
–त्यावर क्लिक केल्यानंतर आपण आपली माहिती दरुस्त करू शकता.
–तुम्हाला तुमच्या बँक खाते क्रमांकामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा लेखापालशी संपर्क साधावा लागेल.

या योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही ?

–पीएम किसान सन्मान योजनेत सरकारी कर्मचारी किंवा प्राप्तिकर भरणारे शेतकरी पात्र मानले जात नाहीत.
–याशिवाय दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे डॉक्टर, अभियंता, सीए आणि कर्मचारीही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
–खासदार आणि आमदारांनाही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही.
–आतापर्यंत देशातील 11.82 कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
–केंद्र सरकारने असे म्हटले आहे की वार्षिक 6 हजार रुपये त्याच शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले जातील, ज्याच्या नावावर शेती असेल.

Leave a Comment

error: Content is protected !!