हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या बहुतांश भागात गारठा वाढला आहे. पहाटे आणि रात्री थंडी तर दुपाराच्यावेळेत उन्हाचा अनुभव नागरिकांना होत आहे. गावांबरोबरच शहरातही तापमानात घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार भारताच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
या भागात थंडीच्या लाटेची शक्यता
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या ४-५ दिवसात वायव्य आणि लगतच्या मध्य भारत आणि गुजरात राज्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात २-४ अंशांनी घसरण व काही ठिकाणी थंडीची किंवा तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील चार दिवसात पूर्व भारत -महाराष्ट्राच्या बहुतांश भागात २-३ अंशांनी घसरण होण्याची शक्यता आहे.
येत्या 4-5 दिवसांत वायव्य व लगतच्या मध्य भारत व गुजरात राज्याच्या बहुतेक भागांत किमान तापमानात 2-4° घसरण व काही ठिकाणी थंडीची/तीव्र थंडीची लाट शक्यता.
पुढील 4 दिवसांत पूर्व भारत – महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत 2-3° ने घसरण.
– IMD pic.twitter.com/3t8hsnV1mL— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 16, 2021
मुंबई, पुण्यातही तापमान घसरले
मागील दोन दिवसात मुंबई शहर आणि आसपाच्या भागात देखील तापमानात घट झाल्याचे पहायला मिळत आहे. आज(१७) सकाळी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार मुंबईतील कुलाबा येथे १९. ८ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे १९. ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच पुण्यात आज (१७) सकाळी शिरूर येथे सर्वात कमी १३ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे.
WEATHER INFO-DTD 17/12/2021
Min Temp
CLB 19.8 DEG. C.
SCZ 19.6 DEG. C.-IMD MUMBAI
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 17, 2021