हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात हलका पाऊस बरसण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ञ के . एस. होसाळीकर यांनी दिली आहे. दरम्यान आज वीस तारखेला दिवसभर राज्यातला हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर या दरम्यान तापमानातील चढ-उतार मात्र कायम राहणार आहे. 22 आणि 23 तारखेला राज्यांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे.
कुठे बरसणार पावसाच्या सरी
राज्यात दिनांक 22 रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र पुणे आणि कोकणामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर दिनांक 23 तारखेला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे. दरम्यान राज्यासाठी कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
22- दिनांक 22 रोजी पुणे, सातारा, रत्नागिरी ,रायगड ,ठाणे ,पालघर, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक ,धुळे ,जळगाव आणि नंदुरबार या भागात पावसाच्या सरी बरसतील.
23- तर दिनांक 23 रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात पावसाच्या सरी बर असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तर भारतात थंडी कायम
दरम्यान उत्तरेकडील भागामध्ये थंडी कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पंजाब, हरियाणा ,उत्तर प्रदेश ,मध्य प्रदेशचा काही भाग आणि बिहार येथे दोन दिवस थंडी कायम राहणार असून काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.