नांदगावात सडलेली सोयाबीन, कपाशीची झाडं अधिकाऱ्याच्या टेबलावर ; संतप्त शेतकऱ्यांची तात्काळ नुकसानभरपाईची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात जोरदार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा विदर्भ भागाला याचा मोठा फाटका बसला आहे. सोयाबीन, कापूस पिके शेतातच कुजली आहेत तर संत्रा पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्याला देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करीत येथील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी चक्क तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांच्या टेबलावर कुजलेली सोयाबीन आणि कपाशीची पिके ठेऊन आपला संताप व्यक्त केला आहे. तात्काळ नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा. सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी २५ हजार रुपये. कापूस उत्पादकाना हेक्टरी ५० हजार रुपये मदत करा संत्रा उत्पादकांना योग्य ती मदत करा या मागणीसाठी युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनि तहसील कार्यालयावर धडक देऊन सडलेली सोयाबीन व कपाशीची झाडे टेबलवर ठेऊन संताप व्यक्त केला ,

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस नांदगाव तालुक्यात झाला आहे आणि तालुक्यातील बहुतांश गावात सतत एक महिन्यापासून ढगफुटी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे शासनाने आदेश असतांना तलाठी व कृषी अधिकाऱ्यानि सरसकट सर्वेक्षण केले नाही. शेतात सोयाबीन काळे पडले तर कपाशीची बोंडे सडली. त्यामुळे खर्चाचे प्रमाणात १० टक्के सुद्धा उत्पन्न होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनि युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना घेराव करून तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली.

Leave a Comment

error: Content is protected !!