हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो शेत आणि शेतातील पाणंद रस्ता हा कच्चा असल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो . मात्र आता महाविकास आघाडी सरकारने यावर तोडगा काढला असून राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविणार असून या योजने अंतर्गत राज्यात 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे हक्काचा पाणंद रस्ता मिळण्यासाठी झगडत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविणार असून या योजने अंतर्गत राज्यात 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. pic.twitter.com/If19ibLCUh
— Balasaheb Thorat (@bb_thorat) October 28, 2021
१) राज्यातील गावागावात शेतरस्ते पाणंद रस्ते तयार करण्यासाठी’ मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते’ योजना राबवण्याचां महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकार मधील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
२) ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते’ या योजने अंतरंगात राज्यात 2 लाख किलोमीटरचे रस्ते बांधता येणार आहेत. त्यामुळे हे रस्ते गावातील मुख्य रस्त्यांना जोडले जातील.
३) या योज़नेच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे रस्ते झाल्यावर शेतकऱ्यांना वेळेवर शेतीमाल बाजारपेठेत घेऊन जाता येणार आहे. कच्च्या रस्त्यांच्यामुळे शेतातून शेतमाल बाजारापर्यंत पोहचणे अवघड होत होते ते आता सोपे होणार आहे. तसेच शेतमाल वेळेत बाजारात जावून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणे शक्य होणार आहे.
४) या योजने अंतर्गत बांधले जाणारे सर्व रस्ते हे योग्य गुणवत्तापूर्ण तयार करण्यात येणार असून ते बाराही महिने वापरता येतील असे शेतरस्ते, पाणंद रस्ते तयार होणार आहेत.