हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात पुढील दोन दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 04 ते 10 मे, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाची काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत.
फळबागेचे व्यवस्थापन
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे सध्या आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच बागेत 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाणी व जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे चिकू बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. चिकू बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे आंबे बहार डाळींब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. बागेत 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.
भाजीपाला
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज व कांदा पिकाची काढणी सकाळी लवकर करावी.
फुलशेती
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.
चारा पिके
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळी चारा पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या चारापिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे.
तुती रेशीम उद्योग
रेशीम अळीस दुध्या रोग म्हणून विषाणू जन्य ग्रासरी तर फ्लॅचरी रोग जिवाणू व विषाणूच्या संयुक्त प्रादूर्भावामुळे होतो. रोगकारक जिवाणू किंवा विषाणू कीटक संगोपन गृहात हळूहळू बळावतात. पहिल्या दुसऱ्या वर्षात यशस्वी पीके निघाल्यानंतर संगोपन गृहातील उर्वरीत काडी कचऱ्याची, मृत अळया, प्लास्टीक चंद्रिकेवरील शिल्लक धागा, वापरात आलेले वर्तमानपत्र इत्यादीची व्यवस्थीत विल्हेवाट लावावी. या वस्तू निर्जंतूक करून कडक उन्हात वाळवून पून्हा वापरता येतील. 2 टक्के ब्लीचींग पावडर व 0.3 टक्के चुना द्रावणात बूडवून ट्रे, प्लास्टीक जाळया आच्छादन उन्हात चांगलेवाळवून पुन्हा वापरता येतील, अन्यथा याच वस्तू पासून रोगाचा फैलाव होतो. उन्हाळयात तापमान 35 अं.ये. च्या वर राहते त्यास 28 सें.ग्रे. ते 30 सें.ग्रे. च्या दरम्यानच ठेवावे.