PM KISAN : ठरलं ! ‘या’ तारखेला जमा होणार नववा हप्ता ; कृषिमंत्र्यांनी दिले शेतकऱ्यांना आमंत्रण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा असते तो दिवस आता जवळ आला आहे. PM KISAN योजनेचा नववा हप्ता याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या ही योजना शेतकऱ्यांना लाभदायी ठरत असून PM KISAN योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना असते. यावेळी सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,000 कोटी रुपये पाठवले जातील.

9 ऑगस्टला जमा होणार हप्ता

हा हप्ता जमा होण्यापूर्वी कृषिमंत्री तोमर यांनी यांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक विशेष संदेश पाठवला आहे. शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकावे अशी, केंद्रीय कृषी मंत्र्यांची इच्छा आहे.नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये”पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधतील. या संवादानंतर ते पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता जारी करतील. तुम्ही pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शन द्वारे या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. हा मेसेज तुम्हाला कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण आहे. “, असं नरेंद्र सिंह तोमर म्हणाले आहेत.

पीएम किसान योजनेत आपले नाव असे पहा

–सर्वप्रथम पंतप्रधान किसान योजना च्या अधिकृत संकेतस्थळावर जा. https://pmkisan.gov.in
–यानंतर तुम्हाला होमपेजवर Farmers Corner पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
–या कोपऱ्यात Beneficiaries List , लाभार्थी यादीचा पर्याय येईल त्यानंतर त्यावर क्लिक करा.
–आता आपल्याला डॅशबोर्डवर क्लिक करावे लागेल आणि राज्य, जिल्हा, तहसील, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
–त्यानंतर Get Report गेट रिपोर्टवर क्लिक करा.
–आता गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या समोर येईल. यामध्ये आपण हे पाहू शकता की योजनेचे पैसे कोणाला मिळवू शकतात

या योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही ?

–पीएम किसान सन्मान योजनेत सरकारी कर्मचारी किंवा प्राप्तिकर भरणारे शेतकरी पात्र मानले जात नाहीत.
–याशिवाय दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे डॉक्टर, अभियंता, सीए आणि कर्मचारीही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
–खासदार आणि आमदारांनाही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही.
–आतापर्यंत देशातील 11.82 कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
–केंद्र सरकारने असे म्हटले आहे की वार्षिक 6 हजार रुपये त्याच शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले जातील, ज्याच्या नावावर शेती असेल..

 

Leave a Comment

error: Content is protected !!