हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसापासून कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. आज दिनांक 21 पासून राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील तर पुढील आठवड्यात 25 जून ते एक जुलै या काळात राज्यात पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.
कोकण आणि पूर्व विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात गुरुवारपर्यंत (24जून ) पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. दक्षिण कोकणची किनारपट्टी उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे कोकणातील काही भागात पाऊस कमी होऊ लागला आहे. आज राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्यातही काही प्रमाणात वाढ होईल रविवारी तारीख 20 सकाळच्या आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील मालेगाव इथं 36.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
7.40 am, 21 Jun,As per the latest observation from Mumbai Radar there s possibility of mod to intense showers in Raigad district during this 2,3 hrs.
Watch for some intense spells at Roha Raigad Alibag… pic.twitter.com/FQhTFcjQlC— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 21, 2021
राज्यातील पावसाचा प्रभाव कमी झाला असला तरी सरासरीच्या तुलनेत 6 अंश सेल्सिअस पर्यंत घट झाली आहे. कोकणात कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही 19 ते 36 अंश सेल्सिअस मराठवाड्यातही तापमान 32 ते 33 अंश सेल्सिअस तर कोकणात 29 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान होते.
दरम्यान बुधवारी भंडारा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर गुरुवारी भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या ठिकाणी जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.