हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी दिनानिमित्त , खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘कृषी संजीवनी’ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचा समारोप कृषी दिनानिमित्त १ जुलै रोजी होणार आहे. तसेच पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार १ जुलैला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहेअशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप तसेच पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार १ जुलैला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या मोहिमेंतर्गत ४० हजार गावांमधील ६ लाख शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले- कृषीमंत्री @dadajibhuse यांची माहिती pic.twitter.com/SDXIPmad9d
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 30, 2021
याबाबत ट्विट करत माहिती देताना कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हंटले आहे की, कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप तसेच पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार १ जुलैला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या मोहिमेंतर्गत ४० हजार गावांमधील ६ लाख शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.
राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे हा प्रयत्न राज्याच्या कृषी विभागाचा आहे. त्याकरिता राज्याच्या कृषी विभागाकडून कृषी संजिवणी मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत शेती संबंधित दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी कृषी शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . ही मोहीम एक जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.