हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात यंदाच्या वर्षी उन्हाळ्यामुळे होणारी पाणी टंचाई जाणवणार नाही. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये 47.72 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा राज्याच्या जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाहीये ही आनंदाची बाब आहे. नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण विभागात लघु मध्यम आणि मोठ्या अशा एकूण धरणांमध्ये सरासरी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या राज्यातील धरणांमध्ये सात टक्के जास्त पाणीसाठा आहे ही राज्यातील जनतेसाठी आनंदाची बाब आहे.
मे महिना उजाडला की राज्यातील बरीच धरणे तळाला गेलेली असतात आणि टंचाईचे संकट उभं राहते पण यंदा चित्र सकारात्मक आहे. धरणे निम्मी भरलेली आहेत त्यामुळे यंदा पाणीटंचाईचा महाराष्ट्राला सामना करावा लागणार नाही. राज्यातील लघु मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून सध्या 47 पॉईंट 72 टक्के पाणीसाठा आहे. काही धरण निम्म्यापेक्षा जास्त भरली आहेत. त्यामुळे राज्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदा मे महिन्याच्या काळात हे राज्याची
पाण्याची चिंता मिटली आहे.
धरणातील पाणीसाठा
अमरावती – 51.82%
नागपूर -52%
औरंगाबाद -58.35%
कोकण -51.35%
नाशिक -48.29%
पुणे -39.12%
एकूण पाणीसाठा -42.72%