पावसाळ्यात गुलाबाच्या शेतीचे नाही होणार नुकसान ! ‘या’ टिप्स चा वापर करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक राज्यांमध्ये अजूनही मान्सूनचा पाऊस सुरू आहे. अशा स्थितीत ठिकठिकाणी हलका, मध्यम व मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना उन्हाच्या तडाख्यातून दिलासा मिळत असतानाच हा पाऊस शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर ठरत आहे.परंतु पावसाळ्यात शेतकऱ्यांची अनेक पिके खराब होतात, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीत, पावसाळ्याच्या दिवसात गुलाब लागवडीवर देखील मोठा परिणाम होतो. पावसाळ्यात गुलाब शेतीचे नुकसान टाळण्यासाठी खालील पर्यायांचा अवलंब करा.

गुलाबाच्या झाडांमध्ये कीटक आणि बुरशी आढळतात

होय, पावसाळ्यात गुलाबाच्या झाडांना कीटक आणि बुरशीचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे या दिवसात गुलाबाच्या रोपांची जास्त काळजी घ्यावी लागते.अशा परिस्थितीत तुम्हीही गुलाबाची लागवड केली असेल किंवा तुम्ही गुलाबाची लागवड करणारे शेतकरी असाल, तर कीटक आणि बुरशीपासून बचाव कसा करायचा ते जाणून घेऊया.

कीटकांपासून गुलाब रोपांचे संरक्षण कसे करावे?

–गुलाबाच्या रोपांसह बागेत किंवा शेतात नियमितपणे तण काढा.

–जंगली गवत वधू देऊ नका.

गुलाबाच्या झाडांना बुरशीपासून कसे वाचवाल ?

पावसाळ्यात गुलाबाच्या झाडामध्ये बुरशीची वाढ होण्याची शक्यता असते, त्यामुळे गुलाबाची पाने, देठ आणि मुळांवर वाईट परिणाम होतो आणि ते कुजतात.
अशा स्थितीत हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या दिवसांत कडुलिंबाचे तेल आणि थ्रीजी या बुरशीनाशकाचा वापर वारंवार करत राहावे.

पावसाळ्यात गुलाब पिकाचे असे करा व्यवस्थापन

पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा पावसाळ्यात गुलाबाची छाटणी करणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तविक, गुलाबाच्या एका रोपामध्ये काही कुजलेले किंवा कोरडे राहिल्यास ते संपूर्ण पीक नष्ट करू शकते, कारण पावसाळ्यात त्याचा संसर्ग एका रोपातून दुसऱ्या रोपात पसरू शकतो. अशा परिस्थितीत, हे टाळण्यासाठी, वेळोवेळी गुलाबाच्या झाडातील मृत टोके आणि कोणत्याही कुजलेल्या किंवा कोरड्या फांद्या 45 अंशांच्या कोनात कापून काढा. या पावसामुळे झाडावर पाणी साचत नाही, ज्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो.

Leave a Comment

error: Content is protected !!