शेतकऱ्यांनो..! राज्यात आजही मुसळधार पाऊस ; पहा तुमच्या जिल्ह्यासाठी काय आहे हवामानाचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र मुंबई कोकणासह राज्यातील ५ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. हवामान खात्याचे तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील रायगड,रत्नागिरी, पुणे , सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

के. एस. होसाळीकर यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार २०-२४ जुलै दरम्यान पावसाचा अंदाज आहे. पावसाचा प्रभाव कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जास्त जाणवेल अशी महिती होसाळीकर यांनी दिली आहे.

या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागानं आजच्यासाठी रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

22 जुलै रोजी सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तसेच 23जुलै रोजी सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी,पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, चंद्रपूर, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!