… तोपर्यंत शेतकरी आंदोलन करीत राहतील : राकेश टिकैत यांची महत्वपूर्ण प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करीत असल्याची घोषणा केली. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी आपले आंदोलन संपवण्याचे आवाहन केले आहे.  तसेच आपापल्या घरी परतण्याचे देखील आवाहन केले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर संसदेत कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत शेतकरी आंदोलन करत राहतील. अशी प्रतिक्रिया BKU नेते राकेश टिकैत यांनी दिली आहे.

तोपर्यंत शेतकरी आंदोलन करीत राहतील …

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृषी कायदे रद्द केल्याच्या घोषणेनंतर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं की या घोषणेनंतर दिल्लीच्या सीमेवर जे आंदोलन चालू आहे तिथे काय परिस्थिती असेल ? आता आंदोलन मागे घेतले जाईल का ? मात्र शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हंटले आहे आहे की ,” संसदेत कायदे मागे घेत नाहीत तोपर्यंत शेतकरी आंदोलन करत राहतील. एमएसपी हमी कायदा तयार करावा लागेल. हा शेतकऱ्यांचा विजय आहे – मरण पावलेल्या 750 हून अधिक शेतकऱ्यांना आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या आदिवासी, कामगार, महिलांना हा विजय समर्पित आहे अशी प्रतोक्रिया टिकैत यांनी दिली आहे.

हा निर्णय एक निवडणूक नौटंकी …

पुढे बोलताना टिकैत यांनी म्हंटलं की , मोदी सरकारचा आलेख ज्याप्रकारे घसरत चालला आहे आणि त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे, ते पाहता हा (निर्णय) देखील एक निवडणूक नौटंकी वाटतो. ते कंपन्यांच्या दबावाखाली काम करत आहेत, त्यांचा फायदा व्हावा म्हणून ते काम करतात . अशी टीका राकेश टिकैत यांनी केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!