हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भातील संत्रा उत्पादकांचा प्रश्न अतिशय गंभीर असून जनप्रतिनिघींनीयाकडे दुर्लक्ष केले आहे. संत्रा उत्पादनाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांचे प्रश्न घेऊन वंचीत बहुजन आघाडी आक्रमक भूमिका घेत आहे. यासाठी नोव्हेंबर मध्ये संत्रा परिषद आयोजित करून संत्रा उपत्पादकांच्या प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे वंचीत प्रदेशाध्यक्ष युवक आघाडी निलेश विश्वकर्मा यांनी अमरावती शहरातील झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
तसेच वंचीत बहुजन आघाडी ही येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणार असून शासनाला धारेवर धरणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिला.यावेळी बोलताना संत्र्यांसाठी मिळणारा बाजारभाव आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे अनुचित बहुजन आघाडी सदैव उभी राहील असे आश्वासन विश्वकर्मा यांनी दिले.