Weather Uodate : ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका नाही…! जाणुन घ्या तुमच्या जिल्ह्याचा आहे का समावेश ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राला पुढील दोन ते तीन दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन तीन दिवसांकरिता पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग,अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

या कारणामुळे राज्यात पावसाची स्थिती

कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर ते पूर्व आणि मध्य भारतातून मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसर पासून अलिगड, जमशेदपूर या भागातून अग्नेय बंगालच्या उपसागरात पर्यंत सक्रिय आहे. मान्सून आज पश्चिम भाग उत्तरेकडे सरकत असून पुढील दोन दिवस तो उत्तरेकडे राहणार आहे. तर पूर्वेकडील भाग हा त्याच्या सर्वसाधारण स्थिती वर असणार आहे.अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात पासून कर्नाटक पर्यंत विस्तारलाय. वरील हवामान स्थिती पावसाला पोषक ठरलीय.

या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका नाही

तसे पाहायला गेले तर वरील हवामानाच्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पण रेड अलर्ट दिलेल्या(पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग,अमरावती) जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र उर्वरित नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, अकोला, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. मात्र या ठिकाणी तुरळक ते माध्यम स्वरूपाचा पाऊस असेल.

Leave a Comment

error: Content is protected !!