हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात गारठा वाढला (Weather Upadte) असून पहाटे आणि रात्रीच्या वेळी जास्त थंडी अनुभवायला मिळत आहे. त्यातही उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. दरम्यान मागच्या २४ तासात यंदाच्या हंगामातील नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आज(२) राज्यात निरभ्र आकाशासह हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान स्थिती
मॉन्सून देशभरातून परतताच उत्तरेकडून थंड व कोरडे वारे महाराष्ट्राकडे येऊ लागले आहे. या वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढू लागला आहे. रात्रीपासूनच किमान तापमानात घट होत असून, पहाटे गारठा (Weather Upadte) चांगलाच जाणवू लागला आहे. दिवसभर निरभ्र आकाश व जोरदार वारे वाहत असल्याने कमाल तापमानात मात्र चढ-उतार सुरूच आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १६ अंशांच्या खाली घसरल्याचे चित्र आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे १०.५ अंश, निफाड येथे ११.४ अंश, तर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक, औरंगाबाद येथेही तापमानात घट झाली आहे. तर राज्याचे कमाल तापमान २९ ते ३५ अंशांच्या दरम्यान टिकून आहे.
कुठे किती तापमान ?(Weather Upadte)
मंगळवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३० (१३.३)
जळगाव ३२.४ (१३.७)
धुळे ३१ (१०.५)
कोल्हापूर ३१.१ (१७.७)
महाबळेश्वर २५.६(१३.५)
नाशिक २९.५ (१२.६)
निफाड २९ (११.४)
सांगली ३१.६(-)
सातारा २९.६ (१४.४)
सोलापूर ३२ (१६.७)
सांताक्रूझ ३४.५ (२०.६)
डहाणू ३३.९ (१९)
रत्नागिरी ३५ (२०.५)
औरंगाबाद २९.७ (१२.५)
नांदेड ३१.४ (१६.४)
उस्मानाबाद – (१३.८)
परभणी ३० (१४.४)
अकोला ३१.५ (१६.०)
अमरावती ३१.६ (१५.१)
बुलडाणा – (१५.६)
ब्रह्मपुरी ३१.६ (१७.३)
चंद्रपूर ३१.४ (१७.४)
गडचिरोली ३१ (१६.६)
गोंदिया २९.२ (१५.२)
नागपूर २९.८ (१५.६)
वर्धा २९.९(१५.८)
वाशीम ३०.६ (१६.८)
यवतमाळ ३०.५ (१४.०)