हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढचे दोन दिवस राज्यामध्ये पाऊस (Weather Update) कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे आणि रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
कोकणात पाऊस ओसरण्याची शक्यता
दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील पावसाची पावसाची (Weather Update) तीव्रता ही पुढील 48 तासात कमी होण्याची शक्यता आहे पण राज्यात मान्सून सक्रिय राहणार आहे. आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे तर नाशिक पालघर रत्नागिरी सातारा आणि कोल्हापूर या भागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीयाआणि गडचिरोली या भागात विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून या भागाला देखील हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील नद्यांच्या आणि धरणाच्या पाणी (Weather Update) पातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर, नागपूर, सातारा, हिंगोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झालाअसून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.