Weather Update : राज्याला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागाला हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुन्हा एकदा दमदार पावसाला (Weather Update) सुरुवात झाली आहे. पुढच्या चार दिवसांसाठी राज्याला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढचे चार दिवस राज्यातील काही भागाला रेड अलर्ट तर काही भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्‍यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आ. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील हवामान खात्याने दिला असून काही ठिकाणी पुरुजन्य परिस्थितीची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान स्थिती

सध्याची हवामान स्थिती पाहता मान्सूनचा आस ऍक्टिव्ह असून सरासरी जागेपासून दक्षिणेकडे शिफ्ट झाल्यामुळे पुढील चार ते पाच दिवस याच जागेवर स्थिर राहण्याची शक्यता आहे. आरबी समुद्रात दक्षिण महाराष्ट्रात (Weather Update) एक केरळ किनारपट्टी समोर तयार होणारे तटीय कमी दाबाचे क्षेत्र आहे. दक्षिण गोलार्धातील भारतीय समुद्रात मादागास्कर बेटाजवळील हवेचे दाब क्षेत्र व त्या निगडित ईशान्यकडील वाहणाऱ्या बळकट वाऱ्यामुळे महाराष्ट्रसह देशाच्या दक्षिणेकडील चार-पाच राज्यांमध्ये पाऊस पडेल असा हवामान खात्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अलर्ट जारी

8 ऑगस्ट – रोजी रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट (Weather Update) देण्यात आल्यात तर मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

9ऑगस्ट – मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी नाशिक पुणे सातारा कोल्हापूर आणि अमरावती नांदेड या भागाला दिनांक 9 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

10 ऑगस्ट – मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी नाशिक सातारा पुणे कोल्हापूर अमरावती वर्धा नागपूर गोंदिया गडचिरोली या भागाला दिनांक 10 रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

11ऑगस्ट – तर दिनांक 11 ऑगस्ट रोजी मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूर आणि नागपूर या भागाला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!