हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुढील पाच ते सहा दिवस कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार आहे. उर्वरित भागात पावसाचा शिडकावा तर काही ठिकाणी उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.
दरम्यान मागील आठवड्यात बंगालचा उपसागर आणि गुजरातच्या किनार्यालगत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. याच वेळी मान्सून हा संपूर्ण देश व्यापला आणि या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्राचा च्या दरम्यान मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला. मध्य भारतात असलेल्या या पोषक स्थिती मुळे कोकणासह राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चांगलीच घट झाली आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ब्रह्मपुरी येथे 35 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहेत.
येथे जोरदार पावसाचा अंदाज
— हवामान विभागाकडून शुक्रवारी संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, अमरावती आणि अकोला या ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
— शनिवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा आणि चंद्रपूर.
–रविवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा
–सोमवारी संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, या ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.