भावाबहिणीचं नातं निसर्गासारखं ! पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी बनवल्या बीजराख्या

rahibai Popre
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना कोण ओळखत नाही ? ‘बीजमाता’ म्हणून त्यांची ख्याती आहे. सध्या देशभर रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राहीबाईंनी यानिमित्ताने बीजराख्या तयार केल्या आहेत. यावरून आपल्या कार्याप्रती त्या किती एकरूप आहेत हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी अशा काही राख्या भारतीय जवानांकरिता पाठवल्या आहेत तर मंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील बीज राख्या पाठवल्या आहेत.

राहीबाईंनी या बीज राख्या भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून स्वत: बनवल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांना बंधू मनात असल्यामुळे त्यांच्यासाठी ह्या बिजराख्यांची अनोखी भेट राहीबाईंनी पाठवली आहे. भावा बहिणीचं नातं निसर्गासारखं आहे. निसर्गासारखं आपल्या बहिणीची काळजी घ्या. सर्व शेतकरी बांधवांना, जवानांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा, असं राहीबाई पोपेरे यांनी म्हटलं आहे.

राहीबाई यांच्याविषयी …

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावातील महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक आहेत. देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. २०२० साली पद्मश्री पुरस्कार दिला.

राईबाईंच्या ‘देशी बियाण्यांच्या बँकेत’ आज ५२ पिकांचे ११४ वाण आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा ‘सीड मदर’ म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला. बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला आहे.[२] सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे डॉ. शिरीष लांडगे, डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. राजेंद्र सांगळे यांनी हे पुस्तक संपादित केले आहे.

राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार स्त्रीया व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपारिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही