हॅलो कृषी । अवकाळी पावसानं राष्ट्रात अनेक ठिकाणी अचानक हजेरी लावल्यामुळे खूप मोठं नुकसान झालं आहे. वादळी पावसानं राज्यात काही ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. यासोबतच वीज कोसळून काही ठिकाणी जीवितहानी सुद्धा झाली आहे. बीडमधील धारूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. यात शेतीचे मोठे नुकसान झाले तर जाहागीर मोहा येथे शेतीची मशागत करण्यासाठी गेलेला टेलर व जीप नदीच्या प्रवाहात वाहून गेले फळबागांचेही नुकसान झाले.
मुसळधार पावसामुळे बीडमध्ये धारूर तालुक्यात छोट्या नदी नाल्यांना पाणी आले आहे. परळी तालुक्यातील शिरसाळा परिसरामध्ये या चौकडी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले तर धारूरच्या घाटामधल्या नदीचे पात्र भरून वाहताना पाहायला मिळालं. सोबतच, बुलडाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील डोनगाव शहरासह देऊळगाव परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे मात्र शेतात कांदा ,गहू काढणाऱ्या शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागली. नांदेड: जिल्ह्यात शेतात काम करत असताना वीज पडून एक महिलेचा मृत्यू झाला आहे तर इतर तीन महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. मुदखेड तालुक्यातील मुगट येथे ही घटना घडली.
जिल्ह्यात सध्या सर्वत्र शेतकरी वर्गाकडून मान्सूनपूर्व मशागतीचे कामे चालू आहेत. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान या पिकाची आंबा मोसंबी आणि इतर फळपिकांना मोठा फटका बसलाय. सांगोला जिल्ह्यातही परिसरात गारांचा पाऊस झाला. पंढरपूर रोड, बुरांडे वस्ती, सावंत वस्ती, बिलेवाडी व सांगोला परिसरात जोरदार गारांचा पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने मोठा कहर केला आहे. जिल्ह्यात वीज पडून आणि पाण्यात वाहून जाऊन 19 जनावरे दगावल्याची माहिती समोर आली होती. औराद शाहजनी, उस्तूरी, कासार बालकुंदा भागात वीज पडून तीन बैलांचा मृत्यू झाला. निलंगा भागातही तीच स्थिती होती. कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्यामुळे नदी नाले भरून वाहू लागले आहेत. यामध्ये सात जनावरे वाहून गेली आहेत.