हॅलो कृषी ऑनलाईन: आंबा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे, आंबा विमा (Mango Insurance) हप्ता कमी झाला आहे. कोकणातील आंबा उत्पादकांच्या (Mango Farmers) मागणीला यश आले असून, आंबा विम्याचा भुर्दंड कमी करण्यात आला आहे. प्रति हेक्टर 29 हजार इतका विम्याचा हप्ता (Mango Insurance) होता. तो कमी करण्यात आला असून, आता 14 हजार 450 इतका करण्यात आला आहे.
तळा तालुक्यातील शेतकरी संघटनेने गेल्या वर्षी आंबा पीक विमा परतावा (Mango Insurance Returns) व पीक विमा हप्ता (Mango Insurance Premium) कमी व्हावा, यासाठी मंत्रालयात कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde), खा. सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे यांच्या समवेत बैठक घेतली होती.
त्यावेळी रायगडमधील शेतकरी (Raigad Farmers) बांधवांना आंबा पीक विमा (Mango Insurance) हप्ता हा इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त असल्याची खंत व्यक्त करीत तो कमी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार यंदा विम्याचा हप्ता कमी करण्यात आला आहे.
कोकण (Konkan) विभागातील भौगोलिक परिस्थिती व गुंठ्यांमध्ये विभागली गेलेली शेती लक्षात घेऊन इतर विभागांच्या तुलनेत कोकणातील शेतकर्यांसाठी सदरची योजना किमान दहा गुंठ्यांमध्ये राबवण्याची संधी देण्यात आली आहे.
असा हप्ता असे संरक्षण
मागील वर्षी आंबा पिकासाठी (Mango Crop) प्रति हेक्टर 29,000 हजार रुपये विमा (Mango Insurance) हप्ता भरावा लागत होता. आता मात्र प्रति हेक्टर 14 हजार 450 रुपये एवढाच हप्ता भरावा लागणार आहे. सदरच्या विम्यानुसार आंब्यासाठी संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार, तर काजू पिकासाठी 1 लाख 20 हजार एवढी रक्कम प्राप्त होणार आहे.
उत्पादकांना दिलासा
आंब्याच्या विमा (Mango Insurance) हप्त्यामध्ये 50 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकर्यांना निश्चितच दिलासा मिळाला आहे, याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली आहे.