हॅलो कृषी । या वर्षी दुष्काळ पडणार नसून, मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असणार आहे असा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने केला आहे. हा अंदाज जूनपासून सुरू होणारा नैऋत्य मॉन्सून मध्ये दीर्घ-कालावधी सरासरीच्या 103 टक्के सामान्य राहण्याची शक्यता आहे. यंदा दुष्काळाची शक्यता नसल्याचंही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत एलपीएचा अंदाज 880.6 मिमी इतका आहे. हा अंदाज खरा ठरल्यास देशात प्रत्यक्षात 907 मिलिमीटर पाऊस राहील.
2020 मध्ये देशात एलपीएच्या 109 टक्के पाऊस होता तर 2019 मध्ये हा आकडा 110 टक्के इतका होता. एलपीएच्या 96-104 टक्के पाऊस म्हणजेच साधारण समजला जातो. स्कायमेटनं जाहीर केलेल्या सुरुवातीच्या अंदाजानुसार देशभरात खरंच इतक्याच प्रमाणात पाऊस पडल्यास, पावसाळ्याच्या महिन्यांत सलग तिसर्या वर्षी भारतामध्ये सामान्य ते साधारण पाऊस पडेल. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावेळी भारतात 1996 ते 1998 दरम्यान सलग तीन वर्षे सामान्य पावसाळा होता.
यामुळे या वर्षी चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्याच्या मागील काही वर्षाचा दुष्काळ मिटण्यास उपयोग होणार आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात पावसाकडे आस लावून बसेल यात शंका नाही. या हंगामाच्या सुरवातीलाच चक्रीवादळामुळं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस चांगला झाल्यास पुढील हंगाम तरी चांगले जातील अशी शेतकऱ्याला अपेक्षा आहे.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा