हेलो कृषी ऑनलाईन : साखर कारखानदारीमध्ये ऊसतोड कामगार (Sugarcane Workers Accident Insurance Scheme) हा महत्त्वाचा घटक मानला जातो. ऊसतोड करत असताना उसतोड कामगारांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्ती बरोबरच इतरही अपघाताच्या घटना घडत असतात. मात्र अशा घटना घडल्यास अपघाती विमा नसल्याने उसतोड कामगारांना नुकसानीस सामोरे जावे लागते.
ऊसतोड कामगारांना मिळणार विमा कवच (Sugarcane Workers Accident Insurance Scheme)
स्व. गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना’ लागू करण्याचा निर्णय आज (दि. 4 रोजी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
ऊसतोड, वाहतूक कामगार व मुकादमांना झोपडी, बैल जोडी साठी विमा संरक्षण मिळणार आहे. साखर कारखान्यांकडून ऊस गाळपावर प्रतिवर्षी प्रति मेट्रीक टन १० रुपयांप्रमाणे मिळणाऱ्या निधीतून या योजनेसाठी खर्च करण्यात येणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून सुमारे 10 लाख ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम, सुमारे दीड ते दोन लाख पशुधनाचा आणि मजुरांच्या झोपडीलाही विम्याचे कवच मिळणार आहे, असे विद्यमान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
मंत्री श्री. धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना त्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची (Sugarcane Workers Accident Insurance Scheme) स्थापना करून त्याअंतर्गत यासंदर्भातील योजना प्रस्तावित केली होती.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 10 लाख ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार, मुकादम तसेच दीड ते दोन लाख बैलजोड्या त्याचबरोबर कामगारांच्या झोपड्या यांना सुद्धा विम्याचे (Sugarcane Workers Accident Insurance Scheme) कवच या निर्णयानुसार लागू करण्यात येत आहे. या योजनेचा संपूर्ण खर्च ‘स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा’च्या भांडवलातून करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार, मुकादम, कारखाना यांपैकी कुणावरही कसलाही आर्थिक भार राहणार नाही.
मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थ व नियोजन विभागाच्या समन्वयातून या योजनेला मूर्त स्वरूप दिले असून, त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. ऊसतोड कामगारांना विम्याचे कवच (Sugarcane Workers Accident Insurance Scheme) असावे, हे दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न शासनाने पूर्ण केले आहे. याचा मनापासून आनंद वाटतो आहे, याबाबद्दल मी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे मनापासून आभार मानतो, असे उद्गार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काढले.
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित
बीडसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यातील 10 लाख ऊसतोड कामगार वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच शेजारील राज्यात कमीत कमी 6 महिने स्थलांतर करून उसतोडणीला जातात. ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा कोणत्याही परिस्थितीत दिवसरात्र अत्यंत मेहनत व जोखमीचे काम त्यांना करावे लागते. ऊसतोडणी व वाहतुकीदरम्यान अनेक अपघात, विजेचा शॉक, सर्पदंश, वाऱ्या-पावसाने नुकसान, रस्ते अपघात यांसारख्या शेकडो समस्यांना तोंड देताना ऊसतोड कामगारांचे अनेकदा जीव जातात, अनेकजण कायमस्वरूपी अपंग होतात व त्यांच्या कुटुंबाचा आधार नाहीसा होतो. त्यामुळे या ऊसतोड कामगारांना, वाहतूक कामगारांना तसेच त्यांच्या पशूंना स्वतंत्र अपघात विमा योजना असावी, व दुर्दैवाने मृत्यू झाल्यास आर्थिक मदत, अपंगत्व आल्यास आर्थिक मदत व उपचार अशा निरनिराळ्या तरतुदी असाव्यात असे श्री. मुंडे यांनी प्रस्तावित केले होते.
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करून घेत श्री. मुंडे यांनी या महामंडळाला मूर्त स्वरूप दिले. महामंडळाचे कार्यकारी संचालक मंडळ तसेच लेखाशीर्ष निर्माण करून ऊसतोड कामगारांची प्रथमच ‘ऊसतोड कामगार’म्हणून नोंदणी केली. साखर कारखाना व त्याच्या समप्रमाणात निधी शासनाकडून अशी कायमस्वरूपी निधीची व्यवस्था केली.