हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी आणि पंचनामे पूर्ण करण्यात येतील असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले. त्यामुळे पंचनामे अपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील सुरजी, शेंडगाव येथील शेतकऱ्यांना तलाठी यांनी यादीतून वगळले याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य बळवंत वानखडे प्रकाश सोळंके यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
याला उत्तर देताना थोरात म्हणाले की, जून आणि जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती खरडून गेलेली असताना यादीत प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तलाठी यांनी वगळले ही बाब खरी नाही. याशिवाय ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पथकाने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकर्यांचे सर्वेक्षण पंचनामा यादी ग्रामपंचायत बोर्डावर प्रसिद्ध केली होती.
तसेच या यादीबाबत काही आक्षेप असल्यास 8 ऑगस्ट 2019 पर्यंत आक्षेप दाखल करण्याचे कळवले होते. तसाच 5 ऑगस्ट 2019 रोजी प्राप्त अपेक्षां बाबत संयुक्त पथकाने शेतीची पाहणी आणि पंचनामा करून प्राप्त अपेक्षा विहित कालावधी निकाली काढले आहेत.