हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या बाजारात उन्हाळी मिरचीची (Chilli Market Rate) आवक सुरू झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात पाणीटंचाई असताना देखील शेतकर्यांनी यावर्षी उन्हाळी मिरचीची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. आता ही मिरची बाजारात येऊ लागली असून, आमठाणा बाजारात मिरची खरेदीला गुरूवारी सुरुवात झाली. यामध्ये ‘तेजा 4’ (Teja 4 Chilli) मिरचीला सर्वाधिक साडेदहा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव ((Chilli Market Rate) मिळाल्याने उत्पादक शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सिल्लोड तालुक्यातील आमठाणा, देऊळगाव बाजार, घाटनांद्रा, धावडा, केळगाव, कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी, करंजखेडा या भागात एप्रिल महिन्यात उन्हाळी मिरचीची (Summer Chilli) यंदा सर्वाधिक लागवड झालेली आहे. आता ही मिरची (Chilli Market Rate) बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. परिसरात आमठाणा येथे मिरचीची मोठी बाजारपेठ असून येथून आखाती देशात ‘तेजा फोर’ मिरची पाठविली जाते.
गुरूवारी या मिरची मार्केटला सुरुवात झाली. यानंतर मिरची खरेदी सुरू करण्यात आली. यात ‘तेजा फोर’ वाणाच्या मिरचीला सर्वाधिक 10 हजार 500 रुपये प्रति क्विंटलचा दर (Chilli Market Rate) मिळाला.
शेतकरी समाधानी
आमठाणा येथील बाजारात मिरचीला मागील वर्षी प्रति क्विंटल 11 हजार रुपये भाव मिळाला होता. या वर्षीही 10 हजार 500 रूपयांचा दर पहिल्याच दिवशी मिळाल्याने शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. आणखी भाव वाढावा किंवा आहे, तोच टिकून राहावा, अशी उत्पादक शेतकर्यांची इच्छा आहे.