यंदा कांदा उत्पादकतेत एकरी 30 टक्‍क्‍यांपर्यंत घट

Kanda
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू वर्षी अतिवृष्टी, तापमान वाढ, अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा फटका उन्हाळी कांदा पिकाला बसला. त्यात वाढीच्या अवस्थेत रोग, किडीचा प्रादुर्भाव, शाखीय वाढ होताना थंडीचा अभाव व वाढलेल्या तापमानामुळे मुदतपूर्व काढणी झाल्याने परिणामी एकरी 30 टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादकतेत घट झाल्याचे उत्तर महाराष्ट्रात दिसून येत आहे.

नाशिक विभागात चालू वर्षी एक लाख 91 हजार 938 हेक्‍टरवर कांदा लागवड आहे. सध्या काढणीला वेग आला असून सरासरी 150 क्विंटल मिळणारे एकरी उत्पादन 100 ते 110 क्विंटलपर्यंत मिळत आहे. तर काही ठिकाणी 75 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी 50 टक्‍क्‍यांपर्यंत घट दिसून येत आहे. ही घट 30 टक्‍क्‍यांपर्यंत झाल्याचं चित्र आहे. डिसेंबर ते जानेवारी मध्यापर्यंत झालेल्या लागवडीमध्ये उत्पादन चांगलं असलं तरी घट दिसून येत आहे. तर 15 जानेवारीनंतर लागवडीत घट अधिक आहे. यावर्षी कमाल तापमान व किमान तापमानात दुपटीचा फरक राहिला. मात्र डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून हे सरासरी तापमान 27 अंश सेल्सिअस जानेवारी 30 तर फेब्रुवारी३० अंशांवर होते.

उत्पादन घटण्याची कारणे

– शाखीय वाढ होण्याच्या कालावधीत थंडीचा अभाव आणि तापमानात वाढ
– विविध कंपन्यांच्या बियांमध्ये शेतकऱ्यांची झालेली फसवणूक.
– जमिनीत बुरशी वाढल्यामुळे कांद्याची अपेक्षित वाढ नाही.
– आठ दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे काढणीपूर्व नुकसान.
– अधिक कालावधीच्या रोपांच्या उशिरा लागवडी.
– फूल कीड यांचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक.