शेतकरी मित्रांनो ! अशी ओळखा पिकातील अन्नद्रव्याची कमतरता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रत्येक पिकाला नत्र , स्फुरद व पालाश या मुख्य तीन मुलद्रव्यांसह कॅल्सीयम ,मॅग्नीशिअम व गंधक या दुय्यम अन्न घटक व सुक्ष्म मुलद्रव्यांची निरोगी , जोमदार पीकवाढ व भरघोस उत्पादन घेण्यासाठी आवश्यकता असते .बऱ्याचदा आपल्याला पिकातील अन्नद्रव्याची कमतरता लक्षात येत नाही. त्यामुळे शेती उत्पादनात मोठी घट होते . प्रत्येक पिकाच्या पानांमध्ये दिसणाऱ्या बदलांमधून पिकातील झाडांमध्ये कोणत्या मूलद्रव्याची कमतरता आहे हे सहज लक्षात येतं . त्यासाठी खालील माहिती तुम्हाला उपयोगी ठरणार आहे .

नत्र – झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते,
फूट व फळे कमी येतात.

स्फुरद – पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.

पालाश -पानाच्या कडा तांबडसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात.
खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.

जस्त – पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो.
पिकांची वाढ खुंटते. पिकांमध्ये पेरे लहान पडतात.

लोह -शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, झाडांची वाढ
खुंटते.

तांबे – पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद
वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात.

बोरॉन – टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन
पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने
मरतात.

मॉलिब्डेनम

पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात.
पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते

गंधक – झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो, नंतर पाने पूर्ण पिवळी-पांढरी पडतात .