हॅलो कृषी ऑनलाईन : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. कारण नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय पुढील कॅबिनेट बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती देखील शिंदे यांनी दिली.
म्हणून शेतकऱ्यांना अनुदानातून वगळण्यात आले होते
जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना 50 हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र यातून कोल्हापूर सातारा सांगलीमधील शेतकऱ्यांना वगळण्यात आले. 2018- 2019 मध्ये या भागात पूर आला होता. या काळात त्यांना मोठ्याप्रमाणात मदत करण्यात आल्याने या शेतकऱ्यांना अनुदानातून वगळण्यात आले होते. मात्र आता या शेतकऱ्यांचा देखील अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे.
लोकप्रतिनिधींनी केली होती मागणी
५० हजार अनुदान देण्याच्या योजनेतून मात्र कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांना वगळण्यात आले होते. 2018- 2019 मध्ये या भागात पूर आला होता. या काळात त्यांना मोठ्याप्रमाणात मदत करण्यात आल्याने या शेतकऱ्यांना अनुदानातून वगळण्यात आले होते. मात्र या जिल्ह्यांना अनुदानातून वगळू नये अशी मागणी धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली होती. त्यामुळे आता पुढच्या कॅबिनेटमध्ये त्यावर निर्णय घेणार आहोत. यामुळे कोल्हापूर , सातारा सांगलीतील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50 हजारांचे अनुदान मिळेल असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.