हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी हंगामासाठी सध्याचे वातावरण चांगले आहे. यंदा महाराष्ट्राचा विचार करता लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. मात्र शेतकऱ्यांना सध्या खतांच्या दरवाढीचा सामना करावा लागतो आहे. एकीकडे क्षेत्र वाढल्याने खतांची मागणी वाढली आहे. मात्र दुसरिकडे अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढविल्या आहेत त्यामुळे महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडत नाहीये. या कारणामुळेच राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मंडविया यांना पत्र लिहिले असून खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करण्याची मागणी भुसे यांनी पत्राद्वारे केली आहे.
तसेच या प्रकरणी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून खतांच्या दरांचा ताबडतोब आढावा घ्यावा आणि खतांच्या दरातली वाढ मागे घेण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करावेत अशी मागणी देखील भुसे यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहेत.
पत्रातील महत्त्वाचे मुद्दे
— खत उत्पादकांनी राज्यात ६ डिसेंबर 2019 रोजी घोषित केलेल्या दरानुसार खताची विक्री करावी.
— सुरळीत पुरवठा राखण्यासाठी आणि खतांचा संतुलित वापर याला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक पावले केंद्रसरकारने उचलावीत.
— रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं.
6 डिसेंबर 2019 रोजी घोषित केलेला दर आणि वाढलेला दर खालीलप्रमाणे
१) 10:26:26-1440-1470(1440-1640) 170 रुपयांची वाढ.
2)12:32:16- 1450-1490(1450-1640) 150 रुपयांची वाढ.
3)16:20:0:13- 1075-1250(1125-1250) 50 रुपयांची वाढ.
4) अमोनियम सल्फेट : 875(1000) 125 रुपयांची वाढ.
5) 15:15:15:19- 1180-1450(1375-1450) 195 रुपयांची वाढ.