हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात वाढलेली हुडहुडी कमी झाली आहे. विदर्भ मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट ओसरली आहे. शुक्रवारी दिनांक 24 रोजी निफाड इथं नीचांकी 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
आज दिनांक 25 रोजी किमान तापमान वाढ होऊन गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेले काही दिवस किमान तापमानात वेगाने घट झालेल्या विदर्भ उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात किमान तापमान दहा अंशांच्या खाली आलं होतं.
मात्र उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची लाट ओसरल्यानंतर राज्यातही गारठा कमी झाला. दिवसाच्या कमाल तापमानातही चढ-उतार सुरूच आहे शुक्रवारी दिनांक 24 सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सोलापूर येथे सर्वाधिक 32.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
24 Dec: राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना,जळगाव,गोंधीया,भंडारा,वर्धा,नागपूर, अमरावती,अकोला जिल्ह्यांत;तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह,हलका ते मध्यम पाऊस व वारा (30-40 किमी ताशी) शक्यता.
27 ला विर्दभात तुरळक ठिकाणी हलका पावसाची
शक्यता.
– IMD
Pl watch for updates.— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 24, 2021
राज्यात मंगळवारपासून पावसाची शक्यता
राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याने थंडी कमी होणार आहे. तर बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पावसाला पोषक हवामान होणार असल्याने सोमवारी विदर्भात तुरळक ठिकाणी तर मंगळवारपासून विदर्भ मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.