Weather Update : पुढच्या 6 तासात चक्रीवादळाचा इशारा! गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर अलर्ट जारी, या भागात पावसाची शक्यता

Panjabrao Dakh Havaman Andaj
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) | राज्यात पुढील ६ तासात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीला अलर्ट देण्यात आला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून ६ तासात याचे रूपांतर चनक्रीवादळात होईल असे हवामान विभागाने सांगितले आहे. (Panjabrao Dakh Havaman Andaj)

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

8, 9, 10 जून रोजी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राचा किनारपट्टीच्या भागात वादळी वार्‍याचा वेग 40-50 kmph, 60 kmph पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक-गोवा-महाराष्ट्राचा किनारपट्टी समुद्र खवळलेला असण्याची शक्यता असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

तुमच्या गावात पाऊस होणार का ते असं केले 1 मिनिटांत चेक

शेतकरी मित्रांनो वातावरणात कधी ऊन तर कधी पावसाचे पहायला मिळतो. यामुळे वातावरणात रोज बदल जाणवतो. आता आपल्याला स्वतःच्या आपल्या गावात पाऊस होणार का हे जाणून घेणं सोयीचं झालं आहे. यासाठी Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi ॲपचे नाव सर्च करा आणि ॲप इंस्टॉल करा. हॅलो कृषी अँपवर तुम्हाला जमीन मोजणी, सातबारा उतारा, पशुपालन, सरकारी योजना, शेतमाल थेट खरेदी विक्री अशा बाबीचा आता एकही रुपये खर्च न करता लाभ घेता येतो.

दरम्यान, राज्यात ८ जूनपासून मान्सूनची सुरवात होईल असे सांगण्यात आले आहे. सध्या अनेक वेगवेगळ्या भागात मान्सूनपूर्व पाऊसाची हजेरी लागत आहे. हळू हळू पावसाचा जोर वाढेल आणि साधारण २५ जूननंतर खऱ्या मान्सूनला सुरवात होईल असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे.

पेरणी कधी करावी?

शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये असे सांगण्यात येत आहे. पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमीन ओली झाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा. वेगवेगळ्या जिल्ह्यांत पाऊसाचा वेगवेगळा अंदाज आहे. यासाठी गुगल प्ले स्टारवरील Hello Krushi या मोबाईल अँपचा उपयोग करून हवामानाचा अचूक अंदाज घ्यावा आणि मगच पेरणी करावी असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.