हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागातील गरीब अल्पभूधारक घर नसलेल्या व्यक्तीने घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून घरांचा लाभ दिला जात आहे. मात्र यादीत चांगली परिस्थिती असलेल्यांच्या नावांचाही समावेश होता. त्यामुळे आधार कार्डच्या आधारे पडताळणी करून वेगवेगळ्या कारणांनी राज्यातील दहा लाख 84 हजार 575 व्यक्तींची नावे व केंद्र सरकारच्या पातळीवरील एनआयसी प्रणालीतून अपात्र केली आहेत.
ग्रामीण भागात गरीब, घर नसलेल्या व्यक्तीला घर मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकार मार्फत पंतप्रधान घरकुल योजना राबवली जात आहे. त्यानुसार प्रत्येक गावातून दोन वर्षांपूर्वी याद्या केल्या. ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत तीन व एनआयसी प्रणालीतून अपलोड केली व केंद्र सरकारने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून यादा परत आल्यावर संबंधित यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत वस्तुस्थितीचे फोटो आणायचे प्रणालीवर अपलोड केले त्यातून 57 लाख 60 हजार 56 व्यक्तींची नोंद झाली होती.
त्या नावाची एनआयसीने पडताळणी करून संबंधितांचा नावे दुचाकी-चारचाकी मालमत्ता, बँक ठेवी, प्लॉट फ्लॅट्स, पूर्वीचे पक्के घर, दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन यासह आर्थिक बाजू भक्कम असल्याचे स्पष्ट करणाऱ्या नोंदी आहेत. अशा व्यक्तींची नावे एनआयसी प्रणालीच्या पडताळणीत अपात्र झाली आहे.
राज्यातील अपात्र 10 लाख 84 हजार 575 नाव असून 46 लाख 69 हजार 596 व्यक्तींची नावे पात्र असल्याचे सांगण्यात आले आहे. आता राहिलेल्या नावांच्या बाबत पात्र नाव असलेल्या व्यक्तींची ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत कुटुंबप्रमुखाचे जॉबकार्ड मॅप करण्याचे काम सुरु आहे. अपात्र झालेल्यांमध्ये कोल्हापूर अहमद नगर जिल्ह्यातील सर्वाधिक नाव आहेत सर्वाधिक पात्र नाव नांदेड आणि जळगाव मधील आहेत.