केंद्र सरकारकडून 2021-22 साठी पिकांच्या उत्पादनाचा अंदाज जाहीर ; ऊसाचा 414.04 दशलक्ष टनाचा विक्रमी अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 2021-22 या वर्षातील प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. 316.06 दशलक्ष टन विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज आहे.नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री म्हणाले की, देशातील अन्नधान्य उत्पादनाचा नवा विक्रम हे शेतकऱ्यांचे कठोर परिश्रम, शास्त्रज्ञांचे कार्यक्षम संशोधन आणि सरकारच्या शेतकरी अनुकूल धोरणांचे परिणाम आहे.

दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, 2021-22 मध्ये प्रमुख पिकांचे अंदाजे उत्पादन खालीलप्रमाणे आहे:

अन्नधान्य – 316.06 दशलक्ष टन. (विक्रम)

तांदूळ -127.93 दशलक्ष टन. (विक्रम)

गहू -111.32 दशलक्ष टन. (विक्रम)

पोषण / भरड तृणधान्ये – 49.86 दशलक्ष टन

मका – ३२.४२ दशलक्ष टन. (विक्रम)

कडधान्ये -२६.९६ दशलक्ष टन. (विक्रमी)

तूर -4.00 दशलक्ष टन.

हरभरा – 13.12 दशलक्ष टन. (विक्रमी)

तेलबिया -37.15 दशलक्ष टन.

भुईमूग – ९.८६ दशलक्ष टन.

सोयाबीन -13.12 दशलक्ष टन.

रेपसीड आणि मोहरी -11.46 दशलक्ष टन. (विक्रमी)

ऊस – ४१४.०४ दशलक्ष टन. (विक्रमी)

कापूस – 34.06 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 170 किलो).

ज्यूट आणि मेस्टा – 9.57 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 180 किलो).

2021-22 च्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, भारतातील एकूण अन्नधान्य उत्पादन 316.06 दशलक्ष टन इतके विक्रमी असल्याचा अंदाज आहे जो 2020-21 मधील अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा 5.32 दशलक्ष टन अधिक आहे. शिवाय, 2021-22 मधील उत्पादन मागील 5 वर्षांच्या (2016-17 ते 2020-21) अन्नधान्याच्या सरासरी उत्पादनापेक्षा 25.35 दशलक्ष टनांनी जास्त आहे.