राज्यात पावसाची विश्रांती; पहा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान कसा असेल पाऊस ?

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील काही भागात माध्यम ते तुरळक स्वरूपात पाऊस पडत आहे . तर काही ठिकाणी ऊन पडले आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या हवामान सूचनेनुसार हवामान तज्ज्ञ डॉ. के.एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात मंगळवारी व बुधवारी कोकणांत काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे . राज्यात इतरत्र हलका ते माध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच त्याच्या पुढच्या २ दिवसात पावसाचे इशारे नाही अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत कसा असेल पाऊस ?

–मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये पाऊस सामान्य, सकारात्मक असेल. तसेच 95 ते १०५ टक्के पाऊस होईल अशी संभावना आहे.
— दुसऱ्या टप्प्यामध्ये देशभरामध्ये सर्वत्र चांगला पाऊस होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण देशामध्ये काही भागांमध्ये सामान्य ते सामान्य पेक्षा अधिक पाऊस पडण्याची संभावना आहे.
— ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण देशामध्ये पाऊस सामान्य राहील आणि त्यांची संभावना 94 ते 106 टक्के असेल अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.