तुरीचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषीतज्ञांचा मोलाचा सल्ला… ; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, कापूस पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तूर मात्र अद्याप काढणीला आलेले नाही त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात. तुरीचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषितज्ज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी तुरीचे शेंडे खोडावेत असा सल्ला नेमाडे यांनी दिला आहे.

वाढत्या पीकाचे शेंडे खोडणे हे जरी वेगळे वाटत असले तरी यामुळे तुरीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. आंरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेनेही अशाच प्रकारची शिफारस केलेली आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना याबाबत कृषी विज्ञान केंद्राने वेळोवेळी मार्गदर्शनही केले आहे. तुर बहरात आली की केवळ वाढ होते. त्यामुळे तुरीचे शेंडे खोडल्यास फांद्या फुटतात व खोडही मजबूत होते. अधिकच्या फांद्या फुटल्या की शेंगाही मोठ्या प्रमाणात लागतात. तुरीची केवळ ऊंची न वाढता झुडपाप्रमाणे घेर वाढतो. त्यामुळे उत्पादनही वाढते. यासंबंधी कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात आलेले आहे. शेंगा खोडण्याची पध्दत ही सोपी असली तरी योग्य वेळी करणे आवश्यक आहे.

उत्पादनही दीड पटीने वाढणार
तुरीची पेरणी ही दोन्ही झाडांमध्ये योग्य अंतर राहील याच पध्दतीने करायला हवी. सव्वा ते दीड फुटाचे अंतर राहिल्यास योग्य वाढ होते. जेवढी विरळ तुर तेवढेच अधिकचे उत्पादन होते. शिवाय योग्य वेळी शेंडे खोडणी केल्यास दीड पटीने उत्पादन वाढणार आहे. तुरीची योग्य काळजी घेऊन एकात्मिक व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब केल्यासही उत्पादन वाढणार आहे.

अशा प्रकारे करा खुडणी
तुरीचे उत्पादन हे खरीप हंगामात घेतले जाते. उडीद, मूग यामध्ये आंतरपिक म्हणूनच याचा पेरा होतो. मात्र, दोन्ही झाडांमध्ये दीड फुटाचे अंतर ठेवल्यास वाढही जोमात होते. शिवाय पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी पहिली शेंडी खुडणी करावी तर पुन्हा पाणी दिल्यानंतर 60 ते 65 दिवसांनी दुसरी शेंडा खुडणी करणे आवश्यक आहे. दोन ते तीन इंचच शेंडा खुडावा याकरिता कोणत्या यंत्राचा वापर न करता शेतकऱ्य़ांनी हातानी ही खुडणी करावी.

खुडणीसोबतच खतव्यवस्थापन
तुरीची खुडणी म्हणजे पीक बहरात असते. त्याच दरम्यान, खत व्यवस्थापन करुन स्फुरद अन्नद्राव्य दिल्यास फुलोर आणि शेंगाची लागवणही वाढते. जेव्हा पीक कळी अवस्थेत असते तेव्हा जमिनीत ओल असेल तर उत्पादनातही वाढ होते. खरीपातील तुरच सध्या वावरामध्ये आहे. त्यामुळे उर्वरीत कालावधीत योग्य काळजी घेतली तर दीडपट उत्पादन हे वाढणार आहे.

संदर्भ : टीव्ही ९