हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात महिन्याभरापासून अवकाळी पाऊस होतोय. तर गारपीट होताना दिसतेय. याचा विपरीत परिणाम हा शेतीवर होताना दिसतो. आज (ता.२६) या दिवशी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोंकण या भागात गारपीट होण्याची शक्यता पंजाबराव डख हवामान खात्याने (Punjabrao Dakh) अंदाज वर्तवला आहे. यासाठी कोंकण विभगातील शेतकऱ्यांनी आंब्यांची देखभाल करणे गरजेचे आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याच्या शक्यतेने झाडांखाली शेतकऱ्यांनी उभे राहू नये. विजांचा त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच जनावरे शेतात न बांधता ते सुरक्षित ठिकाणी बांधावी. राज्यात अवकाळी पावसामुळे कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
आपल्या गावात किती दिवस पडणार पाऊस
अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू असल्याने शेतकऱ्यांना आपल्या भागात किंवा गावात किती दिवस पाऊस किंवा गारपीट होईल. हे पाहणे आवश्यक वाटते. यासाठी शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी Hello krushi हे ॲप सर्च करून इंस्टॉल करा. हवामान अंदाज या विभागावर जाऊन आपल्याला आपल्या गावातील हवामानाबद्दल माहिती एका क्लिकवर मिळू शकते. तसेच शेती ते थेट ग्राहकांपर्यंत विक्री, जमीन मोजणी, नकाशा मोजणी, शेती दुकान, सातबारा उतारा डाऊनलोड करणे हे एका क्लिकवर शक्य झाले आहे.
या विभागात अवकाळी पावसामुळे येलो अलर्ट जारी
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता असून राज्याच्या पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा असून या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तसेच काही भागात तीव्र वादळी पाऊस आणि गारपीट होण्याच्या शक्यतेने खालील नमूद केलेल्या भागात ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत.
या विभागात वादळी पावसामुळे ऑरेंज अलर्ट जारी
नाशिक, पुणे, नगर तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ या भागात वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी करण्यात आले आहे.