हॅलो कृषी ऑनलाईन : मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक भागात पावसाने (Weather Update) हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावणार आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
हवामान तज्ञ् के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आणखी दोन दिवस मान्सूनची (Weather Update) सक्रियता कायम राहणार असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
13 Sept: पुढील 3, 4 दिवस आणि त्यापुढील दिवसात मान्सून राज्यात सक्रिय राहील आणि कृपया येथे सूचित केल्यानुसार विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा वाढता परिणाम होऊ शकतो
दररोज IMD अलर्ट पहा, pic.twitter.com/XRMyKcPyc6— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 13, 2022
आज या भागाला अलर्ट
दरम्यान आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी हवामान खात्याकडून पुणे, रायगड ठाणे पालघर आणि मुंबई या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागात मुसळधार पावसाची (Weather Update) शक्यता आहे. तर नाशिक, नंदुरबार, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागाला यलो अलर्ट देण्यात आला असून या भागात माध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे.