हॅलो कृषी ऑनलाईन: काही शेतकरी (Farmers Success Story) सध्या त्यांच्या भागात घेतले जाणारे विशिष्ट पीक वगळून काही नवीन पीक घेण्याचा प्रयोग (Farm Experiment) करत आहेत. असाच एक यशस्वी प्रयोग केला आहे नाशिक जिल्ह्यातील एका शेतकर्याने. जाणून घेऊ या त्याच्या यशस्वी प्रयोगाविषयी (Farmers Success Story).
नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) कसमादे परिसरात डाळिंब पीक (Pomegranate Area) मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र डाळिंबावर तेल्या व मर रोग (Pomegranate Diseases) आल्याने अनेक शेतकरी डाळिंब पीक सोडून वेगवेगळ्या पिकांची शाश्वत शेती करताना दिसत आहेत. बहुसंख्य शेतकर्यांचा फळशेती (Fruit Farming) करण्याकडे कल आहे.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण, सटाणा, कळवण, मालेगाव हा कसमादे पट्टा म्हणून ओळखला जातो. या कसमादेत मोठ्या प्रमाणात कांदा, डाळिंब, मका, द्राक्ष, भाजीपाला ही पिके घेतली जातात. डाळिंबावर तेल्यारोग व मररोग आल्यापासून कसमादेतील बहुसंख्य शेतकरी दुसर्या पिकाकडे वळले आहेत. शेतकरी पेरू, चिकू, आंबा, द्राक्ष, ड्रॅगन फ्रूट, अॅपल बोर, अंजीर, उन्हाळ्यात टरबूज, खरबूज, काकडी, केळी लागवड करताना दिसत आहेत. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने सुद्धा फळपिके घेण्याकडे कल वाढला आहे.
असेच एक ब्राह्मणगावचे शेतकरी दीपक अहिरे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत येथे नारळाची लागवड (Coconut Farming) केली आहे.
दीपक अहिरे यांनी बागेत नारळाबरोबर लिंबू व पेरुची लागवड केली आहे. नारळाच्या झाडाला पाणी कमी लागते. शेणखत, मजुरी, खतांचा खर्चही कमी असतो (Farmers Success Story).
दीपक अहिरे म्हणाले की, वडील सीताराम अहिरे यांच्या मार्गदर्शनाने व भाऊ रुपेश अहिरे यांच्या मदतीने नारळांची शेती करीत आहे. आगामी काळात कच्ची खजूर लागवड करणार आहे. प्रथमच हा प्रयोग केल्यामुळे अनेक शेतकर्यांसाठी हे फायदेशीर (Farmers Success Story) ठरणार आहे. मालेगावचे उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे यांनी शेतकर्यांना डाळिंब पीक घेताना कुठलाही एकच बहार घेण्याचे सांगितले त्यामुळे तेल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
दीपक अहिरे यांचे नारळ शेतीचे व्यवस्थापन
फळपिकांना खर्च कमी, तसेच उत्पन्न जादा असल्याने बहुतेक शेतकरी या पिकांची लागवड करीत आहेत. दीपक अहिरे यांनी गेल्या वर्षापासून नारळाची झाडे लावली आहेत. येथे चार एकरात पाचशे नारळांची झाडे लावण्यात आली आहेत. यात लहान जातीच्या कोलंबस नारळाची (Columbus Coconut Farming) त्यांनी लागवड केली आहे. या नारळाची वैशिष्ट्ये म्हणजे याला तीन फुटांपासून नारळ येतात. रोप पाच वर्षांचे झाल्यानंतर त्याला नारळ येण्यास सुरुवात होते. एका झाडाला सुमारे पाचशे ते सातशे नारळे लागतात (Farmers Success Story).
अहिरे यांनी आंध्र प्रदेश राज्यातील राजमंडरी येथून थेट तीनशे रुपये नगाप्रमाणे नारळाची रोपे आणली. 18 बाय 18 फुटावर नारळाची त्यांनी लागवड केली आहे. दीपक अहिरे हे नारळ ओल्या शहाळ्यासाठी वापरणार आहेत (Farmers Success Story).
बरेचदा एकच पीक त्या त्या भागात घेतल्याने किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे हे टाळण्यासाठी पीक फेरपालट किंवा वेगळ्या पिकांचा प्रयोग करणे लाभदायक ठरत असते. दीपक अहिरे यांनी केलेला हा नवीन प्रयोग इतर शेतकर्यांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे (Farmers Success Story).