हॅलो कृषी ऑनलाईन : पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये 2 दिवसांपूर्वी कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाने धाड टाकली होती. यामुळे मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याच्या दरात 15 रुपयांनी घसरण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी 40 रुपये किलो विकला जाणारा कांदा आज 25 रुपये किलोने विकला जात आहे. मुंबई एपीएमसी कांदा बटाटा घाऊक बाजारा आज कांद्याची आवक 100 गाडी इतकी झाली आहे.
केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी गुरुवारी छापे टाकण्यात आले होते. सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांचे कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली. आयकर विभागाने रोख रक्कमही जप्त केली. हा पैसा मोजण्यासाठी तब्बल 80 अधिकारी होते. त्यांनी नाशिक, पिंपळगावमधील बँकामध्ये जवळपास 18 तास रोकड मोजली. दरम्यान, या कारवाईमुळे मार्केटमध्ये नियंत्रण आल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी एका टीव्ही माध्यमाशी बोलताना सांगितली.
आयकर विभागाचे १३ ठिकाणी छापे
त्यामुळे किरकोळ बाजारात दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावाचा भडका उडाला आणि ऐन सणासुदीच्या काळात भाव वाढली त्यामुळे आयकर विभागातर्फे 13 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामुळे बाजार साध्य नियंत्रणात आली आहे. यामध्ये असे दिसून येत आहे की कांदा व्यपारी कांदा साठवणूक करुन भाव वाढवले जात होते.