हॅलो कृषी ऑनलाईन: शेती करताना शेतकऱ्यांना अनेक समस्या येत असतात. मग शेतकऱ्यांना कृषी आधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. मात्र शेतकरी मित्रांनो आता केवळ एका फोन कॉल द्वारे तुम्ही तुमच्या शेतीतील समस्यांचे निराकरण होऊ शकते. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत किसान कॉल सेंटर द्वारे कृषी शाश्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळवू शकता. मोदी सरकारने 14 किसान कॉल सेंटरची संख्या वाढवून 21 केली आहेत. कोणत्याही भागातील शेतकरी त्यांना फोन करून त्यांच्याच भाषेत माहिती मिळवू शकतात. या केंद्रातील तज्ज्ञ 22 भाषांमध्ये माहिती देतात. तीन महिन्यांत 10,91,237 शेतकर्यांनी शेतीविषयक शास्त्रीय सल्ला घेतला आहे.
निशुक्ल मिळते सेवा
–किसान कॉल सेंटरचा टोल फ्री क्रमांक 1800-180-1551 आहे. शेतकरी या क्रमांकावर कॉल करण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.
–या 21 केंद्रांमध्ये बसलेले तज्ञ पदवीधर फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, रेशीमपालन, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय आणि जैवतंत्रज्ञानातील डॉक्टर आहेत.
–केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार या शास्त्रज्ञांनी गेल्या तीन वर्षांत 1,74,67,074 शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर करणं आणि त्यांचं उत्पन्न वाढवणं हा यामागील उद्देश आहे.
कोणत्या प्रश्नांची मिळतात उत्तरे
–शेतकरी कोणत्याही दिवशी सकाळी 6:00 ते रात्री 10:00 दरम्यान किसान कॉल सेंटरच्या क्रमांकावर कॉल करू शकतात.
— जर शेतकऱ्यांना पिके आणि बियाण्यांशी संबंधित कोणतीही समस्या येत असेल तर या ते किसान कॉल सेंटरवर कॉल करुन मदत घेऊ शकतात.
–आपण खते आणि कीटकनाशकांच्या वापराच्या प्रमाणाची माहिती देखील मिळवू शकतात. फळबाग, पशुवैद्यकीय आणि कृषी उत्पादनांच्या किंमतींबाबत देखील मदत केली जाते.
तब्बल 22 भाषांमध्ये मार्गदर्शन
किसान कॉल सेंटरमधील तज्ज्ञ हिंदी, मराठी, गुजराती, तेलगू, भोजपुरी, छत्तीसगढी, तामिळ आणि मल्याळम यासह 22 भाषांमध्ये माहिती देतात. शेतकऱ्यांनी केलेला फोन कॉल सेंटरवर उचलला गेला नाही तर नंतर किसान कॉल सेंटर वरून शेतकऱ्याला फोन केला जातो. किसान कॉल सेंटरमध्ये नोंदणी केल्यावर, एक मजकूर संदेश किंवा व्हॉइस संदेश देखील शेतकऱ्यांना पाठविला जातो.