हॅलो कृषी ऑनलाईन: कृषी क्षेत्रात विकसित नवनवीन तंत्रज्ञान (Farmers Success Story) यांचा वापर आणि सोबतच जोडव्यवसाय केला तर उत्पादन नक्कीच वाढते हे सिद्ध करून दाखवले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी (Chandrapur Farmers) पिता पुत्राने.
नागभीड तालुका हा मुख्यत: धान पिकाचा पट्टा असल्याने खरीपात हे पीक (Kharif Crop) मुख्यतः घेतले जाते. वर्षानुवर्षे हेच ठरलेले पीक शेतकरी घेत असल्यामुळे नवीन असे प्रयोग फार कमी शेतकरी करतात. मात्र नागभीड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गिरगाव गावातील सुनील सुकारे व त्यांचा मुलगा धीरज सुनील सुकारे हे पिता-पुत्र शेतकरी याला अपवाद ठरले आहेत (Farmers Success Story).
बारमाही भाजीपाला शेती
शेतकरी सुकारे हे पाच एकर धानाच्या शेतीमध्ये बारमाही विविध भाजीपाल्यांची लागवड (Perennial Vegetable Farming) करत आहेत. यातून वर्षाला लाखो रूपयांचे उत्पादन ते घेतात (Farmers Success Story). त्यांचा मुलगा धीरज याने मत्स्यव्यवसायाचे (Fish Farming) प्रशिक्षण घेतले आहे, त्यामुळे शेतातच मत्स्य टाक्यांच्या माध्यमातून माशांचे उत्पादन घेत आहे.
त्यांच्या पाच एकर शेतात सुकारे यांनी धान पिकाव्यतिरिक्त चवळी शेंगा, कारली, मेथी, पालक, दोडके, कोथिंबीर, भेंडी असा विविध प्रकारचा भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे ते या भाजीपाला पिकासाठी केवळ सेंद्रिय खताचाच वापर करतात. भाजीपाला उत्पादनात त्यांचे हे दुसरे वर्ष आहे. यावर्षी केवळ दीड एकर शेतात त्यांनी चवळी शेंग लावली आणि एकाच पिकातून त्यांना तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. यासाठी त्यांना एक लाख रुपये एवढा खर्च आला. त्यांचा भाजीपालाही शेतातूनच ठोकीने विकला जातो. त्यांच्याकडे सिंचनाची सुविधा म्हणून एक विहीर आहे. या विहिरीवर सौर पॅनेल बसवून ते वर्षभर विविध भाजीपाल्यांचे (Farmers Success Story) उत्पादन घेत असतात.
सोबतीला शेळी, कुक्कुटपालन विक्री
सुनील सुकारे यांचा मुलगा धीरज हा सुद्धा भक्कमपणे त्यांच्या सोबतीला असतो. शेतातच मत्स्य टाकी बनवून वर्षाला 50 ते 60 हजारांचे उत्पादन घेत असल्याचे धीरज सांगतो. शेतातच त्यांनी टिनपत्रा टाकून फार्म हाऊस सुरू केले असल्याने शेतीव्यतिरिक्त ते शेळीपालन (Goat Farming), गावठी कोंबड्यांची (Poultry Farming) विक्री करून उत्पादन घेत असतात. यासाठी अजूनपर्यंत त्यांनी शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही. स्वबळावर त्यांनी ही बारमाही शेती अवघ्या पाच एकर शेतात फुलवली आहे (Farmers Success Story).
अलीकडे पूर्वीसारखा निसर्गाचा समतोल राहिला नसून नैसर्गिक बदलामुळे ऋतुतही फरक पडलेला आहे आणि निसर्गाचा लहरीपणाही वाढलेला आहे. त्यामुळे दरवर्षी पाऊस अगदी वेळेवर आणि समाधानकारक पडेल, हे तंतोतंत सांगता येणे आता कठीण झाले आहे. यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करून पिकांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी प्रचंड कष्ट उपसत शेतात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून काहीतरी वेगळे करण्याचा प्रयोग (Farmers Success Story) सुनील सुकारे व धीरज सुकारे या पिता-पुत्रानी अवलंबला. त्यांचा हा प्रयोग खरच कौतुकास्पद आहे.