Monsoon : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट; परतीच्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता?

Monsoon
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आज (दि. 25) कोकण तसेच घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Monsoon) शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात परतीच्या पावसाला सुरूवात झाली असून मान्सूनने काल मंगळवारी (दि. 24) गुजरात, राजस्थानच्या आणखी भागांसह पंजाब व हरियाणाच्या काही भागातून माघार घेतली आहे.

काही भागात मुसळधार पावसाची (Monsoon) शक्यता

राज्यात आज (दि. 25) रायगड व पुणे जिल्ह्यात मुसळधार (रेड अलर्ट) पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, वाशिम या जिल्ह्यांना अतिजोरदार (ऑरेंज अलर्ट) पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलडाणा, परभणी, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत (यलो अलर्ट) जोरदार पावसाची, तर बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना (यलो अलर्ट) विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर व सांगली जिल्ह्यांत आज हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.