हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील शेतकर्यांसाठी (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024) एक आनंदाची बातमी आहे. शिंदे सरकारने (State Government) पुढील पाच वर्ष शेतकर्यांना मोफत वीज देण्या संदर्भातील जीआर काढला आहे. एप्रिल 2024 ते मार्च 2029 दरम्यान ही योजना लागू करण्यात येणार आहे. सरकारने अर्थसंकल्पात शेतकर्यांचे वीज बील माफ (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024) करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा जीआर काढण्यात आला आहे
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024) अंतर्गत जे शेतकरी 7.5 एचपी म्हणजे अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकर्यांना मोफत वीज मिळणार आहे. पुढील पाच वर्ष मोफत वीज (Free Electricity For Farmers) देण्या संदर्भातील जीआर शासनाने (Government GR) काढला आहे. एप्रिल 2024 ते मार्च 2029 दरम्यान ही योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा 44 लाख 03 हजार शेतकर्यांना (Farmers) होणार आहे.
तीन वर्षानंतर घेण्यात येणार आढावा
या योजनेला (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024) तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे जीआरमध्ये सांगण्यात आले आहे. शेतकर्यांना कृषी पंपाची वीज मोफत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केला होता.
सरकारला वीज बिलापोटीचे भरावे लागणार 14760 कोटी रुपये
या वीज बिलापोटीचे सरकारला 14760 कोटी रुपये रक्कम महावितरणला द्यावी लागणार आहे. कृषी पंप वीज बिलाची एकूण थकबाकी 50 हजार कोटी रुपये आहे. या वीज बिल माफीसाठी येणारा खर्च राज्य सरकार उचलेल. राज्य सरकारला दरवर्षी महावितरणला 14 हजार 760 कोटी रूपयांचे अनुदान द्यावे लागणार आहे.
राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख कृषिपंप ( Agriculture Water Pump) ग्राहक शेतकरी आहेत. एकूण वीज ग्राहकांच्या तुलनेत हे प्रमाण 16 टक्के आहे. 30 टक्के वीज कृषी पंपांसाठी वापरली जाते. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39 हजार 246 दशलक्ष यूनिट आहे. राज्यात कृषी पंपांना रात्री 8/10 तास किंवा दिवसा 8 तास वीजपुरवठा केला जातो.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ
जे शेतकरी 7.5 एचपीपर्यंत कृषी पंप वापरतात त्यांना मोफत वीज मिळणार आहे. म्हणजेच 7.5 एचपीपेक्षा कमी क्षमतेचे कृषी पंप वापरणार्या शेतकर्यांनाच मोफत वीज मिळणार आहे. केवळ 7.5 एचपी पंपासाठी हा निर्णय नाही. पण 7.5 एचपीपेक्षा जास्त क्षेमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बील भरावे लागेल.