हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात चार प्रकारातील डाळींचा साठा यावर निर्बंध लागणारी अधिसूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने जारी केली आहे राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सहसचिव चारुशीला तांबेकर यांनी सोमवारी काढलेल्या अधिसूचनेत राज्यात तूर मसूर उडीद आणि हरभरा डाळीचा साठ्यांवर 31 ऑक्टोबरपर्यंत निर्बंध असतील असे म्हटले आहे.
केंद्र शासनाने डाळींच्या साठ्यावर घाऊक किरकोळ व्यापारी आणि मिलर्ससाठी साठा निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्यात घाऊक व्यापारी आता डाळींचा 500 टनापेक्षा जास्त आणि एकाच प्रकारच्या डाळींचा 200 पेक्षा जास्त साठा करू शकत नाहीत. असं सहसचिव आणि आदेशात नमूद केला आहे.
साठा जास्त झाल्यास काय कराल ?
किरकोळ व्यापारी पाच टनांपेक्षा जास्त आणि मिलर्स ला गेल्या सहा महिन्यातील उत्पादन किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या 50% यापेक्षा जास्त असेल. त्यापेक्षा जास्त साठा करता येणार नाही. 19 जुलै अखेर समजा एखाद्याकडून जास्त साठा असल्यास fcainfoweb.nic. in या संकेतस्थळावर जाहीर करावा लागणार आहे. अतिरिक्त डाळींचा साठा येत्या 30 दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत कमी करणे आवश्यक असेल. डाळीच्या आयात दारांना मात्र साठा निर्बंधांचे आदेश लागू नसतील. मात्र अशा आयात दारांना देखील या संकेतस्थळावर साठा माहिती जाहीर करावी लागेल. राज्य शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. असा इशारा अन्न मंत्रालयाने दिला आहे.
घाऊक व्यापारी – 500टन, एकाच प्रकारचा डाळींचा 200 टन.
किरकोळ व्यापारी – 5 टन
मिलर्स – गेल्या सहा महिन्यातील उत्पादन किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या 50 टक्के यापैकी जे जास्त असेल.