Weather Update : सतर्क राहा …! राज्यात मुसळधार पाऊस ; पुणे, कोल्हापूर सह 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Rain Paus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या (Weather Update) सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शेतकरी राजा सुखावला आहे. शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र हवामान खात्याकडून पुढच्या ४-५ दिवस राज्यत मुसळधार पाऊस बरसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील कोकण , मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

हवामान तज्ञ के. एस . होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच पश्चिम किनार्‍यावरील द्रोणिय स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व-पश्चिम शियर,मान्सून ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे स्थित असल्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

राज्यातील जिल्ह्यांना अलर्ट जारी

आज दिनांक 12 जुलै रोजी नाशिक, पालघर, पुणे ,कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड तसेच गडचिरोली या जिल्ह्यांना रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली असून सातारा, औरंगाबाद ,जालना आणि चंद्रपूर या भागांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यात ठाण्याचाही समावेश आहे. तर अहमदनगर धुळे, जळगाव ,नांदेड ,परभणी, वाशिम अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा ,नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान खात्याकडून (Weather Update) देण्यात आला आहे.

13 जुलै – दिनांक 13 जुलै रोजी पुणे, रायगड, पालघर, आणि नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे तर सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, ,मुंबई, अकोला, अमरावती आणि नागपूर या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. धुळे जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना ,बुलढाणा ,यवतमाळ ,वर्धा ,वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली ,गोंदिया आणि भंडारा या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नाशिकमध्ये ढगफुटी

दरम्यान नाशिकमध्ये अनेक भागात मुसळधार पावसामुळे (Weather Update) जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे. याशिवाय धोक्याच्या ठिकाणी असलेल्यांनी तातडीने प्रशासनाशीसंपर्क करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असंही सांगण्यात आलं आहे.