हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात थंडीची चाहूल लागली असून पहाटे आणि रात्रीच्या कमाल तापमानात (Weather Update) घट होऊ लागली आहे. दिवसभर मात्र उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. दरम्यान सोमवारी नोंदवलेल्या तापमानानुसार राज्यात नीचांकी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आज हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार
नैॡत्य बंगालच्या उपसागरात उत्तर श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर या प्रणालीपासून केरळ, तमिळनाडू ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (Weather Update) तयार झाला आहे. दक्षिण भारतातील राज्यात पावसाचा जोर वाढणार असला तरी महाराष्ट्रात मात्र निरभ्र आकाश आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढू लागला आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १६ अंशांच्या खाली घसरले होते. तर कमाल तापमान २९ ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे.
कुठे किती तापमान ?(Weather Update)
सोमवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३०.६ (१३.४)
जळगाव ३४(१४.५)
कोल्हापूर ३१.२ (१७.४)
महाबळेश्वर २६.६(१३.४)
नाशिक ३०.७ (१३.६)
निफाड ३०.१ (१२)
सांगली ३२.१(१५.८)
सातारा ३०.४(१४.२)
सोलापूर ३२.७ (१७)
सांताक्रूझ ३५.४(२०.५)
डहाणू ३४.३ (२०.५)
रत्नागिरी ३५ (१९.४)
औरंगाबाद ३०.६ (१३.३)
नांदेड ३१.६ (१७)
उस्मानाबाद – (१४)
परभणी ३१.६ (१५.९)
अकोला ३३.२ (१७.७)
अमरावती ३२.० (१५.५)
बुलडाणा ३०.६ (१६.४)
ब्रह्मपुरी ३१.८ (१६.३)
चंद्रपूर ३१.४ (१७.२)
गडचिरोली ३१.४(१६)
गोंदिया ३०(१५.६)
नागपूर ३०.८ (१५.६)
वर्धा ३१(१६.४)
वाशीम – (१६.८)
यवतमाळ ३२.५ (१४.५)