हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या बऱ्याच भागांमध्ये काल ढगाळ वातावरण राहिले. काही भागात मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडला. दरम्यान आज दिनांक २९ सप्टेंबर रोजी राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज अव्यक्त करण्यात आला आहे. आज कोकण मध्य महाराष्ट्र , मराठवाडा विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान स्थिती
वायव्य बंगालच्या उपसागरात (Weather Update) आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. उत्तर अंदमान समुद्रापासून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे आज राज्यात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मॉन्सूनने २० सप्टेंबर रोजी वायव्य भारतातील राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून काढता पाय घेतला. त्यानंतर तब्बल आठ दिवस उलटूनही बुधवारी (ता. २७) मॉन्सूनच्या परतीची सीमा ‘जैसे थे’ आहे. परतीसाठी पोषक हवामान झाल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागांतून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे.
या भागाला यलो अलर्ट
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये विजांसह पाऊस (Weather Update) हजेरी लावणार असून या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.