हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या लहरी हवामान अनुभवायला (Weather Update) मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यात गारठा अनुभवायला मिळत होता मात्र त्यानंतर उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित भागात कालपासून उकाडा जाणवायला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही ठिकाणी ढगाळ हवामान सुद्धा आहे. राज्यात तापमानात चढ -उतार सुरूच आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान झाल्याने उकाडाही वाढला आहे. आज (ता. २६) विदर्भात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मागच्या २४ तासात किमान १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान स्थिती ?
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर (Weather Update) असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती अरबी समुद्र आणि केरळच्या किनाऱ्यालगत असून, या वाऱ्यामुळे समुद्रावरील बाष्पयुक्त वारे कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाड्याकडे येत आहे. या भागात ढगाळ हवामान होत असून, किमान तापमानात वाढ होण्याबरोबरच दिवसा उकाडा जाणवू लागला आहे. उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.
कुठे किती तापमान ?(Weather Update)
शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३१.८ (१५.९), नगर (१७.१), जळगाव ३१ (१५.७), धुळे ३० (१०), कोल्हापूर ३१ (२१.५), महाबळेश्वर २६.८(१६.६), नाशिक ३०.४ (१३.४), निफाड ३०.१ (११.२), सांगली ३१.५ (२०.४), सातारा ३१.५ (२०.४), सोलापूर ३२.८ (२१.७), सांताक्रूझ ३३.३ (२०.६), डहाणू ३०.१ (१९.३), रत्नागिरी ३४ (२३.१), औरंगाबाद ३०.६ (१३.४), नांदेड – (१७), परभणी ३१.१ (१५.६), अकोला ३२.४ (१४.२), अमरावती ३१.२ (१४.५), बुलडाणा ३१.६ (१४.२), ब्रह्मपुरी ३२.३ (१३.९), चंद्रपूर २९.२ (१५.४), गडचिरोली ३१.२(१३), गोंदिया २८.८(११.५), नागपूर ३०.२ (१२.७), वर्धा ३०.२ (१३.६), वाशीम ३०.८ (१२.६), यवतमाळ ३१(१२.५).