‘या’ कारणामुळे राज्यात पुढील 3 दिवस आणखी वाढणार गारठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. मंगळवारी दिनांक 14 रोजी निफाड येथे नीचांकी 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज दिनांक 15 रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

वायव्य आणि उत्तर भारतातील राज्यात गारठा चांगलाच वाढू लागला आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, राजस्थान इतर राज्यात किमान तापमान सहा ते दहा अंशांच्या दरम्यान आहे. मंगळवार दिनांक 14 रोजी हरियाणाच्या हिस्सार इथं देशाच्या सपाट भूभागावरील सर्वात निचांकी 4.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील ही थंड हवा महाराष्ट्राकडे येणार असल्याने तीन दिवसात किमान तापमानात आणखी घट होणार आहे.

दरम्यान कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान 30 अंश व त्याखाली आले आहे. मंगळवार दिनांक 14 च्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी येथे सर्वाधिक 34. ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात किमान तापमानात हळूहळू घट होत आहे. विदर्भ मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 15 अंशांच्या जवळपास आला आहे.